महाराष्ट्र पोलीस दलाबाबत या राज्यातील जनता मोठा अभिमान बाळगताना दिसून येते.एकीकडे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र पोलीस दलावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच सर्वसामान्य जनतेचा मात्र महाराष्ट्र पोलीस दलाबाबतचा अभिमान तुसभरही कमी झाला नाही असेच दिसून येते,आणि त्याला कारण आहे अजूनही या पोलीस दलात सर्वसामान्य जनतेला अतिशय आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी व कर्मचारी होय.
मात्र असे असले तरी गेल्या वर्षभरापासून राज्यात लाचलुचपत विभागाकडून केलेल्या कारवाईत अगदी dysp दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांपासून ते सामान्य पोलीस कॉन्स्टेबल पर्यत शेकडो कर्मचारी यांच्यावर लाचखोरी प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पहावयास मिळत आहे.मुंबईतील सौरभ त्रिपाठी नावाचा पोलीस उपायुक्त तर लाचखोरी प्रकरणी अजूनही फरार आहे.या साऱ्या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र पोलीस दलाबाबत अभिमान बाळगणारे पोलीस कर्मचारी आणी सामान्य जनता मात्र अस्वस्थ होत असल्याचे दिसून येते.
काल दिनांक ११ एप्रिल रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे याने खाजगी इसमाच्या माध्यमातुन तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत १५ हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या युनिटने रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी सदर पोलीस निरीक्षक व खाजगी इसम ऋषिकेश पतंगे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…