ताज्याघडामोडी

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना डीटीएच चॅनेलद्वारे शिक्षण, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

दिव्यांग तसेच गतिमंद विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे. पहिली ते बारावीत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत.

या मुलांना 12 डीटीएच चॅनेलमार्फत शिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा दिव्यांग, गतिमंद विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य मुलांनाही होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांना वेगळय़ा पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र सरकार अशा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत नसल्याचा दावा करत ‘अनामप्रेम’ व ‘नॅब’ या संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

संस्थेच्या वतीने ऍड. उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले कि, दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत, काही जणांकडे स्मार्टफोन नाहीत तसेच ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने यूटय़ूब व इतर ऍपच्या माध्यमातून शिक्षण घेणे कठीण जात आहे.

राज्य सरकारच्या वतीने ऍड. प्रियभूषण काकडे आणि ऍड. रीना साळुंखे यांनी माहिती देताना खंडपीठाला सांगितले की, या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरकार कटिबद्ध आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी 12 डीटीएच चॅनेलच्या माध्यमातून त्यांना शिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago