कोरोनाचा आलेख उतरता असून रुग्णसंख्याही रोडावली आहे. दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोना आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसताच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लागू असणारे कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
जनता कर्फ्यू लागू करून आज बरोबर दोन वर्ष झाले आहेत. या काळात रुग्णसंख्या कोट्यवधींचा आकडा पार करून गेली. मात्र आता तिसरी लाट कमी झाली असून दररोज हजारांमध्ये रुग्ण सापडत आहेत. तसेच लसीकरणामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. हिच वेळ साधत केंद्राने 31 मार्चपासून देशातील कोविड-19 प्रतिबंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्बंध हटणार असले तरी सहा फुटांचे अंतर आणि मास्क घालणे या दोन गोष्टी पाळाव्या लागणार आहेत.
निर्बंध हटवण्यासोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी डीएण कायदा लागू करणारा आदेशही मागे घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘डीएम’ कायद्यान्वये जारी मार्गदर्शक तत्वे काढण्याचे आदेश दिले आहेत.
23 हजार सक्रिय रुग्ण
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 778 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 आहेत. लसीकरणही वेगाने सुरू असून आतापर्यंत 181.56 कोटी कोरोना डोस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…