ताज्याघडामोडी

आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नाही

आई-वडिलांच्या संपत्ती प्रकरणी सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका महिलेने आपल्या पतीची संपत्ती विकण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

पतीच्या संपत्तीचे कायदेशील पालकत्व (मालकी) मिळावी यासाठी सोनिया खान यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यांचे पती दीर्घकाळापासून आजारी असून त्यामुळे त्यांना हा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांचा मुलगा आसिफ खान याने विरोध केला केला आणि वडिलांच्या नावे असलेला फ्लॅट विकण्यास आडकाठी निर्माण केली. आसिफ खान यानेही आई व बहिणींसह न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आसिफ यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती की, वडील मानसिक आजाराशी (डिमेंशिया) झुंज देत आहेत, त्यांना अनेकदा झटकेही आले आहेत. आजारपणामुळे वडिलांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करावे लागते. वडील आजारी असल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत तसेच सहीदेखील करू शकत नाहीत. त्यामुळे आपण वडिलांचे कायदेशीर पालक असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले.

तसेच वडिलांच्या संपत्तीचे पालकत्व माझ्याकडे आहे, असे आसिफ याने न्यायालयात सांगितले. आई-वडिलांकडे दोन फ्लॅट असून, एक फ्लॅट आईच्या नावे आहे, तर दुसरा वडिलांच्या नावे. त्यामुळे वडिलांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर आपला अधिकार असल्याचे आसिफ यांनी न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने आसिफ यांचा दावा फेटाळला आणि सोनिया यांच्या यांच्या बाजूने निर्णय दिला.

न्यायालयाने काय म्हटले?

दरम्यान, वडिलांची काळजी असल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा आसिफ खान यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही असं न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंठपीठाने याचिकेवर निकाल देताना सांगितलं.

आसिफ खान यांनी केलेले सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर आई-वडील जिवंत असताना मुलं त्यांच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकतात असं उत्तराधिकार कायद्यात कुठेही म्हटलेले नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago