ताज्याघडामोडी

ऊस तोडा, नाहीतर पेटवून देवू; उत्पादक शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक साखर कारखाना २०१३ पासून बंद आहे. या कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे.

या क्षेत्रातील उभ्या उसाची तोड पूर्ण होईपर्यंत आजुबाजूच्या साखरकारखान्यांचे गाळप बंद करण्यात येवू नये, अशी मागणी ‘नासाका’चे माजी चेअरमन तानाजी गायधनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संपूर्ण ऊस तोडला नाही तर शेतकऱ्यांवर संपूर्ण क्षेत्र पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशी हतबलताही गायधनी यांनी पत्राद्वारे पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.

नासाका गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहे. असे असले तरी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. गेल्या काही वर्षांपासून नासाका कार्यक्षेत्रातील ऊस कोपरगाव, संजीवनी, अगस्ती, कादवा, प्रवरा, संगमनेर हे कारखाने घेत होते. मात्र यंदाच्या गळीत हंगामात नासाका कार्यक्षेत्रात दीड वर्ष उलटलेला सुमारे दीड लाख मेट्रिक टन ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यातच या साखर कारखान्यांनी पाठविलेले ऊसतोड मजूर माघारी नेले आहेत. जे काही मजूर सध्या नासाका कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी उपलब्ध आहेत, ते देखील २५ फेब्रुवारीपर्यंतच काम करणार आहेत.

परिणामी या कारखान्याच्या क्षेत्रातील नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रावरील उभ्या ऊसाची तोड होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी जादादरोन मजुरी उकळली जात आहे. काही ठराविक शेतकऱ्यांचाच ऊस तोडण्यास आतापर्यंत या कारखान्यांनी प्राधान्य दिले आहे.

शेतकऱ्यांचे हाल थांबविण्यासाठी संपूर्ण उसाची तोड होईपर्यंत मजूर देण्याचे आणि साखर कारखान्यांचे गाळप बंद न करण्याचे आदेश कोपरगाव, संजीवनी, अगस्ती, कादवा, प्रवरा, संगमनेर या साखर कारखान्यांना देण्याची मागणी तानाजी गायधनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास नासाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील ऊस पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याची वस्तुस्थितीही गायधनी यांनी कळविली आहे.

नासाका सुरू करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘नासाका’ सुरू करा, असे साकडेही गायधनी यांनी अजित पवार यांना घातले आहे. हा साखर कारखाना कोणत्या राजकीय पक्षाचा नेता चालविण्यास घेतो यापेक्षा साखर कारखाना सुरू होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे नासाका सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्याचे आदेश जिल्हा बँकेस देण्याची मागणीही गायधनी यांनी केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago