ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी; डोळ्यांदेखत ६२ एकर ऊस जळून खाक

अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शॉर्टसर्किटमुळं ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. जालना जिल्ह्यातही ६२ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळं आग लागून ६२ एकर ऊस जळाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या पळखेडा ठोंबरी या गावात घडली आहे. या हंगामात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पळखेडा शिवारात पाचशे एकरच्यावर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच काल रविवारी सकाळी दहाच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतातील विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने उसाला आग लागली.

जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली. शेतकऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग अधिक पसरत होती आणि हा हा म्हणता आगीचे लोण परिसरात पसरू लागल्याने गावकऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

तो पर्यंत बघता बघता ३९ शेतकर्यांचा ६२ एकरवरील ऊस जळून खाक झाला. ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago