दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्या कारणावरून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी तिचे अपहरण केले. याबाबत पतीने पोलिसात तक्रार दिली आहे.
हरमन जाहगीड, फिर्यादी यांच्या पत्नीच्या काकांचा मुलगा, तीन महिला आणि दोन अज्ञात व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या विवाहितेच्या पतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा त्यांच्या पत्नीशी प्रेमविवाह झाला आहे. मात्र या विवाहाला पत्नीच्या माहेरच्या लोकांचा विरोध आहे. पत्नीच्या माहेरच्या लोकांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फोन करून फिर्यादी यांच्या पत्नीला भेटण्यासाठी बाहेर रस्त्यावर बोलविले.
त्यामुळे फिर्यादी, त्यांची पत्नी आणि आई हे तिघेजण रस्त्यावर आले. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पत्नीच्या आई-वडिल आणि इतर नातेवाइकांनी पत्नीचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…