राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे सांगत राजन साळवी यांना धमकी देण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने पत्र लिहून साळवी यांना धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत. असल्या फुसक्या धमक्यांन ते घाबरणारे नाहीत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत,’ असे ते म्हणाले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…