विवाहेच्छुक तरुणांना हेरून लग्न लावून लाखोंची फसवणूक करणाऱया इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे.
याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथील विक्रम केशव जोगम (वय 24) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विक्रम जोगम यांचा विवाह 22 जून 2021 रोजी म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय 38, रा. चांदणी चौक, तारदाळ, ता. हातकणंगले) हिच्याशी झाला होता. यावेळी विवाह ठरविण्यासाठी संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबू शेख, समिना फिरोज शेख (रा. शाहूनगर चंदुर, सध्या रा. ठाकरे चौक, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले होते.
हा विवाह ठरविताना यापूर्वी झालेल्या तीन विवाहांची माहिती लपवून ठेवली होती; तर विक्रम जोगम यांच्याकडून घेतलेली रक्कम त्यांनी वाटून घेतली होती. त्यानुसार संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथून राधानगरीचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सुरेश मेटील यांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…