कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱयांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस घेणाऱयांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
अजित पवार म्हणाले, देशात आणि राज्यात मोठय़ा प्रमाणात लस शिल्लक आहे. राज्यात पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणेदोन कोटी आहे. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस न घेणाऱयांवर काही बंधने आणण्याचा विचार करतोय, जेणेकरून ते दुसरा डोस घेतील, असेही अजित पवार यांनी म्हटले.
ओमायक्रोनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली आहे. संसर्गाबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहेत. डोंबिवलीतील रुग्ण होता तो बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर बाधित झाले नाहीत. ओमायक्रोनबाबत समज, गैरसमज असून केंद्र सरकारने ते दूर करावेत, असेही त्यांनी म्हटले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…