पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यात ऊस,द्राक्ष,केळी,डाळींब आदी पिकांना वेळेत पाणी देणे गरजेचे असते मात्र महावितरण कडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा समाना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणच्या या मोहिमेमुळे उध्वस्त होणार आहे.त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे.जर तात्काळ हि मोहीम थांबविली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…