ताज्याघडामोडी

एसटीच्या 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त, महामंडळाची कठोर कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवारी महामंडळाने संपात सहभागी 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 2776 इतकी झाली आहे.

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महामंडळाने संप मोडायच्या हालचाली चालू केल्या आहेत. एसटी महामंडळाने संपात सहभागी रोजंदारी कामगारांना 24 तासांत कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, अशा कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कर्मचाऱ्यांना 24 तासांत कामावर येण्याची नोटीस बजावली होती. त्यापैकी 238 रोजंदारी कामगारांना आज अखेर त्यांची सेवा समाप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आज 297 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित झालेल्या कामगारांची एकूण संख्या आता 2776 इतकी झाली आहे.

दरम्यान, सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महामंडळाने विविध मार्गांवर 131 बसेसद्वारे 3,517 प्रवाशांची वाहतूक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago