ताज्याघडामोडी

आधी पैसे भरा, मग वीज वापरा, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राज्य सरकारने शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना वीज बील माफ करण्याची मागणी अजित पवारांकडे केली. यावेळी ठाकरे सरकार नवीन सिस्टीम आणण्याच्या विचारात असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

थकीत वीज बील माफ करण्याच्या शेतकऱ्याच्या या निवेदनाचा धागा पकडत ठाकरे सरकार आता विजेच्या वापरासाठी नवी सिस्टीम आणणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो. एसटी महामंडळाच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे आपण पाहत असल्याचं अजित पवार म्हणाले.

तर महावितरणाची अवस्था सध्या एसटी महामंडळ सारखीच झाली आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचा वापर करण्यासाठी प्रीपेड सिस्टीम आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. ही सिस्टीम अंमलात आणली तर मोबाईल प्रीपेड कार्ड प्रमाणे महावितरण कंपनीही प्रीपेड कार्ड आणण्याचा विचार करत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

त्यानूसार जर वीज पाहिजे असेल तर त्यासाठी 2 ते 3 हजार रूपयांचं रिचार्ज करून दर महिन्यासाठी वीज घ्यावी लागेल. विजेच्या वापरानुसार वीज बील कट केलं जाईल. तर महावितरणाची 71 हजार कोटी रूपयांची महावितरणाची थकबाकी असून कोळसा घ्यायलाही अडचण होत आहे. आर्थिक शिस्त लावल्याशिवाय या संकटातून बाहेर पडता येणार नसल्याचंही अजित पवार म्हणाले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago