नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याला बँकेनं कर्ज वसुलीबाबत नोटीस पाठवली आहे. संबंधित नोटीस बजावल्यानंतर, आर्थिक संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने बँकेसमोरच विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बँकेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
केशव रामदास पवार असं आत्महत्या करणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते माहूर तालुक्यातील नयेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बुलडाणा अर्बन बँकेचं दोन लाखांचं कर्ज होतं. दोनेक दिवसांपूर्वी बँकेनं त्यांना कर्जफेडीबाबतची नोटीस पाठवली होती. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास पवार हे कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी बँकेत गेले होते. पण बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बँकेच्या आवारातच विष प्राशन केले आहे.
मृत पवार यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं, हाता-तोडांला आलेला घास अस्मानी संकाटानं हिरावला होता. त्यामुळे पवार मागील काही काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होते. तसेच बँकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून त्यांना नैराश्य आलं होतं. अशात बँकेनं कर्जवसुलीसाठी नोटीस बजावल्यानं पवार यांनी आपलं जीवन संपवलं आहे. पवार यांनी अशा पद्धतीनं हृदयद्रावक शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…