ताज्याघडामोडी

पंढरपूरकरांसाठी दोन दिवसात दुसरी आनंदाची बातमी आणि ….

८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात आले.पालखी मार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याने माझ्यासह बहुतांश पंढरपूरकर समाधानी झाले.

पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।

आणिक न करि तीर्थव्रत ।।

या संत तुकोबारायांच्या अभंगाला पिढ्यान पिढ्या प्रमाण मानत विठुरायाच्या वारीने समाधान पदरात पाडून घेणाऱ्या भाविकांचा पंढरपूरकडे येणार मार्ग सुखकर झाला याचा मलाही अतिशय आनंद वाटतो.अशातच ना.नितीन गडकरी यांनी वाखरी बायपास ते विठ्ठल मंदिर या रस्त्यासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करत हेही काम लवकरच हाती घेण्याची घोषणा केली या बद्दल त्यांचे आणि या रस्त्याच्या कामाचा समावेश पालखी मार्गाच्या कामात व्हावा म्हणून पंढरपूरच्या विकासासाठी ज्यांच्याकडे अनेक महत्वपूर्ण योजना आहेत,प्रस्ताव आहेत अशा आमदार प्रशांत परिचारक यांचे नक्कीच मी मनपूर्वक आभार मानतो.

मी नेहमी सांगत आलो आहे कि पंढरपूरच्या सर्वागीण विकासासाठी पुढील दोन -तीन दशकाची गरज लक्षात घेवुन अशा विकास कामाचा आराखडा कागदावर नव्हे तर डोक्यात ठेवून पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांत परिचारक हे होय.

पण याच वेळी माझी एक नाराजी कधीही लपविली नाही.. ती म्हणजे निकृष्ट पद्धीतीने होणारी विकास कामे,जी कामे केल्यानंतर अगदी काही दिवसात,महिन्यात त्या कामांची वाट लागलेली असते.

एप्रिल महिन्यात जेव्हा यात्रा अनुदानातून प्रदक्षिणा मार्ग कॉक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत नगर पालिकेने निविदा काढल्या त्यावेळी माझ्या ताकतीनुसार मी त्यास कडाडून विरोध करत प्रदक्षिणा मार्ग कॉक्रीटीकरणाच्या कामातील आणि काम केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी याचा उहापोह केला होता.पण त्याची दखल घेतली गेली नाही.

पण आता प्रदक्षिणा मार्गाचे कॉक्रीटीकरण रद्द करून डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.कारणे तीच देण्यात आली जी मी सहा महिन्यापूर्वी मांडले होते.

फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे.. सव्वादोन कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात येणारा प्रदक्षिणा मार्ग निदान पुढील दोन वर्षे तरी सुस्थितीत रहावा.आणि राजकीय निष्ठा,पक्ष निष्ठा आदी बाबी बाजूला सारत या या भूवैकुंठ नगरीत करण्यात येणारी विकास कामे तकलादू होऊ नये अशी धारणा असलेली जे थोडेफार जागरूक नागिरक आहेत त्यांना हि एक संधी आहे.निकृष्ट पद्धतीने विकास कामे होत असतील तर आवाज उठविण्याची,आणि आणखीही एक कारण आहे,नगर पालिका निवडणुका समीप आल्या आहेत.कामे तर खूप सुरु केली जातील पण यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव आणि अवस्था लक्षात वास्तव मांडण्याची देखील एक संधी आहे.

कारण शहरातील इतर काही रस्त्यांचे असेच काम काम करण्यात आले आणि वर्षा-सहा महिन्यात त्याची वाट लागलेले दृश्य आम्ही याची देही याची डोळा अनुभवतो आहोत !

– राजकुमार शहापूरकर

(संपादक -पंढरी वार्ता )

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago