ताज्याघडामोडी

लग्नानंतर सातव्या दिवशी नववधू पैसे आणि दागिने घेऊन पसार

लग्नानंतर सात दिवस सोबत राहिलेली नववधून पैसे आणि दागिने घेऊन पळून दिल्यामुळे नवरदेवाला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या नववधूनं पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिला होता. लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली.राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबुरामचं शांती नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर बाबूरामच्या घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही आश्चर्य वाटलं होतं.

लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला शांतीनं नकार दिला होता. त्यासाठी काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यात संबंध नव्हते. आपल्या पत्नीचं लवकरच मनपरिवर्तन होईल आणि सगळं काही सुरळीत होईल, या प्रतिक्षेत बाबूराम होता.लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत हॉस्पिटलमध्ये जाण्याची विनंती तिने केली. मात्र हॉस्पिटलमध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला फोन लावण्याचे प्रयत्न केले, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला सत्य समजलं. घरातील पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पोबारा केल्याचं त्याच्या लक्षात आलं.

पत्नीने दगा दिल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय त्याने घेतला. लग्न करून सामान्यांना लुबाडणाऱ्या टोळीचा हा प्रताप असावा, असा पोलिसांना संशय आहे. मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यताही वर्तवण्यात असून केवळ पैसे आणि दागिने लुटून नेण्याच्या बहाण्याने हे लग्न झालं असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago