ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवणं चुकीचं आहे. हा सामना थांबवला पाहिजे. खेळाडूंनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखलं पाहिजे. यासंदर्भात मी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार आहे.
रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…