भीमा नदीकाठच्या लोकांना पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडून सतर्कतेचा इशारा

पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे उजनी धरणात दौण्डहून येणाऱ्या निसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तविला असून त्यामुळे उजनी धरण व्यस्थापन सतर्क झाले आहे.आज रात्री ९ वाजता उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पंढपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बाबत प्रांताधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार आज रात्री ८ वाजता उजनी धरणाचा उपयुक्त साठा १०८% इतका झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे.यामुळे दौण्डहून निसर्गात वाढ होण्याची शक्यता असून पुरनियंत्रणाच्या दृष्टीने धरण व्यवस्थपणाने आज रात्री ९ वाजले पासून ५ हजार क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडण्याचे निश्चित केले.या विसर्गात परिस्थिती पाहून कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago