केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे.मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.
ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असे सरनाईक म्हणाले. आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे उघडावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. अनेकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. परंतु, अशा संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आयतच निमंत्रण मिळेल.
त्यामुळे देव्हाऱ्यात देवाची पूजा करावी. मंदिरे उघडण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी, असे सांगतानाच आज ना उद्या शाळाही उघडतील. याबाबत सरकार आणि लवकर तोडगा काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…