ताज्याघडामोडी

लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे*

लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे

आपल्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने निरा उजवा कालवा व उजनी धरण क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या उभ्या पिकांना सदर कालव्यातील पाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे कालव्यातील पाणी घेण्यात येत नाही. शासन नियमांनुसार विहिरीवरील पाणीपट्टी माफ असल्याने या क्षेत्रावरील पिकांपोटी पाणीपट्टी भरण्यात येत नाही. अशा विविध कारणांना पुष्टी देत लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांच्या सहमतीने विशिष्ट अर्ज भरून घेण्याचा व त्यांना सिंचन लाभापासून वंचित ठेवण्याच्या कुटील अमिषास लाभार्थी शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी केले आहे.

लाभक्षेत्रातील विहिरींवर संचित होणाऱ्या क्षेत्राचे बाबतीत संबंधित शेतकऱ्यांकडून सिंचन प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये विहिरीवर सिंचित होणाऱ्या क्षेत्रास कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी लागत नसल्याचे व सदरील क्षेत्र विहिरीच्याच पाण्यावर सिंचित होत असल्याचा अजब जावईशोध निरा उजवा कालवा सिंचन प्रशासनाने लावून शेतकऱ्यांना नाहरकती व स्वखुशीने अर्जरूपी प्रमाणपत्र भरण्यास भाग पाडले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

पाणी हे जीवन आहे असे आपण नेहमीच ऐकत अनुभवत आलो आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचा बागाईत अथवा ओलावापणा प्रामुख्याने पाण्यावर सर्वस्वी अवलंबुन असतो. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धतता करण्यासाठी शेतकरी अनेक पाणी स्रोत निर्माण करण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबत असताना विहिरीत पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना कालव्यातील पाण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिमा उभी करून शेतकऱ्यांकडून असे अर्ज भरून घेणे म्हणजे लाखोंचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकरी जातीची क्रूर चेष्टा असल्याने शेतकऱ्यांनी अशा भुलभुलैया आश्वासनास बळी पडू नये. अन्यथा एकदा आपल्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळले तर भविष्यात त्याचे खूप मोठे दूरगामी परिणाम भोगावे लागतील असे आवाहनही आ. आवताडे यांनी केले आहे.

उजनी धरण व निरा उजवा कालवा आदी लाभक्षेत्रातून अनेक शेतकऱ्यांना उपरोक्त पद्धतीने अर्ज भरण्यासाठी भाग पाडले जात आहेत परंतु या सर्व अन्यायकारक घडामोडीचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेणे असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी म्हटले आहे.

 

चौकट – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून अर्थिक खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना असे अर्ज भरून घेणे म्हणजे त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेण्यासारखे असल्यामुळे सदरचा खटाटेप थांबवून अर्ज भरून घेऊ नयेत अन्यथा मोठे आंदोलन उभा करू – आ. समाधान आवताडे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago