पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा कालउपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते..
संबंधीत प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.
गुप्ता म्हणाले, ‘पिंगळे यांच्या पिशवीत दोन पत्रे सापडली आहेत. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले आहे. कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते.
सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्देवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.’
– दिलीप वळसे – पाटील (गृहमंत्री)
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…