ताज्याघडामोडी

‘आठ वर्षांपूर्वी माझा मृत्यू झाला होता, आता पुनर्जन्म’, आई-वडिलांना शोधत मुलगा थेट घरी पोहोचला

हिंदी चित्रपटांमधून आपण पुनर्जन्माच्या कित्येक गोष्टी पाहिल्या आहेत. व्हिलनने हत्या केल्यानंतर पुनर्जन्म घेऊन हीरो आपला सूड उगवतो, अशा आशयाच्या कित्येक स्टोरीज आहेत.

पण खरोखरच असा पुनर्जन्म होणं शक्य आहे का? उत्तर प्रदेशातल्या मैनपुरीमध्ये एका मुलाने आपला पुनर्जन्म झाल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर त्याने गेल्या जन्मातील आपले आई-वडील, बहीण, गाव आणि शाळाही ओळखून दाखवली आहे. या प्रकारामुळे हा मुलगा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मैनपुरी जिल्ह्यातील नगला सलेही गावातील एका लहान मुलाचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. प्रमोद कुमार श्रीवास्तव यांचा 13 वर्षांचा मुलगा रोहित कुमार याचा 4 मे 2013 रोजी पाण्यात बुडल्यामुळे दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर प्रमोद कुमार आणि त्यांची पत्नी उषा देवी या आपल्या मुलीसोबत राहत होते. या घटनेच्या आठ वर्षांनंतर, शेजारच्या गावातील एक मुलगा अचानक नगला सलेही गावात आला. गावात आल्यानंतर थेट श्रीवास्तव यांच्या घरी जात, त्याने आपण रोहित कुमार असल्याचा दावा केला. चंद्रवीर उर्फ छोटू असं या मुलाचं या जन्मातलं नाव आहे. आपण गेल्या जन्मी रोहित होतो, आता आपला पुनर्जन्म झाला आहे, असं चंद्रवीरचं म्हणणं होतं.

नगला अमर सिंह गावात राहणारा चंद्रवीर लहानपणापासूनच आपला पुनर्जन्म झाल्याचं घरच्यांना सांगत असे. त्याचे वडील रामनरेश शंखवार यांनी सांगितलं, की छोटूने यापूर्वीही बऱ्याच वेळा नगला सलेही गावात येण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, आपला मुलगा आपल्यापासून दुरावला जाईल, म्हणून ते याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर, छोटूचा हट्ट जिंकला, आणि 19 ऑगस्ट 2021 ला ते छोटूला घेऊन नगला सलेही गावात आले.

गावात आल्यानंतर चंद्रवीरने थेट रोहित कुमारचं घर गाठत, रोहितच्या आई-वडिलांची आणि बहिणीची भेट घेतली. त्यांना भेटून तो आपल्या पूर्वजन्मातील गोष्टी सांगू लागला. हे बघून गावातील लोकही त्यांच्या घराबाहेर जमले, आणि इतर गोष्टींबाबत विचारणा करू लागले. यादरम्यान, गावातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र यादवही तिथून जात होते. चंद्रवीरने त्यांनाही अचूकपणे ओळखून त्यांच्या पाया पडला. हे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर लोक त्याला रोहित कुमारच्या शाळेतही घेऊन गेले. तिथेही त्याने बरोबर सांगितले, की गेल्या जन्मी तो कोणत्या वर्गात शिकत होता. सध्या चंद्रवीर सांगत असलेले किस्से ऐकण्यासाठी गावकरी गर्दी करत आहेत. त्याच्या पुनर्जन्माची कथा आजूबाजूच्या गावांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago