कुटूंब म्हणले कि भाडणं आलेच,आणि ज्या संसारात पती-पत्नी एकमेकांशी भांडत नाहीत त्या संसारात काहीतरी उणीव आहे असे म्हटले जाते.संसार कितीही प्रेमाचा असला तरी भांड्याला भांडे लागण्याचे निमित्तही भांडण सुरु होण्यास कारणीभूत ठरते असे म्हटले जाते.भांडण झाले कि मग आदळआपट आली,रुसवा आला,पतिराजाच्या जेवणाची आबाळ आली आणि नंतर गोड समझोताही आलाच.पण एखादया वेळी किरकोळ कारणावरून सुरु झालेले भांडण विकोपाला जाते.
असाच प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असून माहेरी जाण्याचा हट्ट करीत असलेल्या पत्नीला पतीने नंतर जा असे सांगत पती झोपी गेला.आणि रात्री १२ वाजता त्याला जाग आली ती बायकोने डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार केल्यानंतरच.बायकोने बॅटचे आणखी दोनचार फटके लागवल्यानंतर आरडा ओरडा ऐकून घर गोळा झाले आणि पतिराजाची सुटका झाली.
या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात सदर पतीने आपल्या पत्नी विरोधात फिर्याद दिली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…