गुजरात सरकारने साबरमती येथील महात्मा गांधी यांचा आश्रम पाडून तेथे संग्रहालय उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे तो धक्कादायक असून सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.
या आश्रमात महात्मा गांधी यांनी तेरा वर्ष वास्तव्य केले आहे. त्यामुळे या जागेला आणि त्यांच्या आश्रमाला मोठे महत्व आहे. हा आश्रम देशभरातील लोकांसाठी एक श्रद्धेचे स्थान राहिला आहे. महात्मा गांधी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कसे राहात असत याची माहिती लोकांना या आश्रमातील भेटीतून मिळत असते.
त्यामुळे हा आश्रम पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी मागणी गहलोत यांनी केली असून या निर्णयात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गुजरात सरकारने साबरमती आश्रमाच्या पुनर्रविकासाचा हा प्रकल्प राबवण्याचे योजले असून त्यासाठी बाराशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत असे सांगितले जाते.
आश्रमात अत्यंत साध्या पद्धतीने महात्माजी राहात असत आणि म्हणूनच त्याला आश्रम म्हणतात, येथे संग्रहालय उभारण्याची गरज नाही असेही गहलोत यांनी म्हटले आहे. देशाचा हा महान ऐतिहासिक ठेवा नष्ट केला गेला तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहींत असेही गहलोत यांनी म्हटले आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…