ताज्याघडामोडी

“माऊलीं’चा आळंदीतच 19 जुलैपर्यंत मुक्काम; पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – आषाढी वारीसाठी शासकीय निकषांसह मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला (2 जुलै) सायंकाळी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. विठू भेटीसाठी आसुसलेल्या अलंकापुरीत विठूनामाचा जयघोष मंदिरातअन्‌ घराघरात एवढेच नव्हे वारकऱ्यांच्या श्‍वासाश्‍वासातही सुरू झाला आहे. परंपरेनुसार, माऊलींच्या मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू झाला. यंदाही गतवर्षीप्रमाणेच विशेष वाहनाने माऊलींच्या चलपादुका पंढरपूरला मार्गक्रमण करणार आहेत.

– असा असेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : व्हिडीओ

वारकऱ्यांची आस त्यांना स्वस्थ बसू देणार नाही.त्यांची पावले कदाचित आळंदीकडे वळू शकतात. साथीच्या या काळात ते टाळण्यासाठी सोमवारपासून आळंदी शहरासह नजीकच्या अकरा गावांमध्ये 4 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड लावून नाकाबंदी केली आहे.

प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी दिलेल्या 100 वारकऱ्यांची बुधवारी (दि. 30) आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच चाचणीनंतर त्या वारकऱ्यांचे वास्तव्य फ्रुटवाले धर्मशाळेत असेल. शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमावली पाळून प्रस्थान सोहळा पार पडणार असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे – पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, प्रस्थानानंतर दि. 3 ते 19 जुलै पर्यंत पालखी सोहळा आळंदीतच माऊलींच्या आजोळघरी असेल. 19 जुलैला माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. 19 ते 24 जुलै माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर 24 जुलै पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास करतील.

प्रस्थान सोहळा कार्यक्रम (2 जुलै)

* पहाटे 4 ते 5.30 पवमान पुजा आणि अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती

* सकाळी 9 ते 11 वीणा मंडपात कीर्तन

* दुपारी 2.30 वाजता माउलींच्या समाधीवर पोशाख. वीणा मंडपात मानकऱ्यांना मानाचे पागोटे वाटप

* दुपारी 3 वाजता वारकऱ्यांना पान दरवाजातून प्रस्थानासाठी प्रवेश

* सायंकाळी 4 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ

* सायंकाळी 7 वा. माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी

सर्व दिंड्यांतील विणेकऱ्यांना परवानगी?

शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे मर्यादित संख्येत प्रस्थान सोहळा होणार आहे. मात्र संस्थान कमिटीची इच्छा आहे की, प्रत्येक दिंडीतील एका वारकऱ्याला किंवा विणेकऱ्याला प्रस्थानच्या वेळी प्रतिनिधीत्व मिळावे. यासाठी शासनाबरोबर पत्रव्यवहार, मिटिंग सुरु आहेत. शासनानेही त्याला अनुकुलता दर्शवली आहे. कदाचित 430 दिंडी, विणेकरी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहू शकतील.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago