मुंबई : राज्यात आज (28 जून) कोरोना आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पण यामध्ये आता घट झालेली आहे. त्यामुळे राज्याला थोड्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 727 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेत 2 हजारांनी कमी आहे. 27 जूनला राज्यामध्ये 9 हजार 974 रुग्ण सापडले होते.
दिवसभरात किती रुग्ण बरे?
गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 812 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वधारला आहे. हा दर आता 95.99 टक्क्यांवर पोहचला आहे.
किती जणांचा मृत्यू?
रुग्णसंख्येच्या घटीसह मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. दिवसभरात 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा आता 2.1 टक्के इतका झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…