करोना बाधितांची संख्या घटत आहेत. बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत; मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दल निर्णय झालेला नाही. वारकऱ्यांनी सरकारकडे यंदा किमान पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असे म्हणत वारकरी संप्रदायाने सरकारला तीन पर्याय दिले आहेत. सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल; मात्र सरकारने पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी अभय टिळक यांनी केली आहे.
‘देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर या देवसंस्थानांच्या वारी सोहळ्यासाठी सरकारने प्रत्येकी 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. करोना स्थिती वाढली, तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढेच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत,’ अशी माहिती अभय टिळक यांनी दिली.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…