मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे.
संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाबाबत 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत.
याप्रसंगी आम्ही करोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला होता.दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्यावर पाळत राज्य सरकार ठेवतयं की, केंद्र सरकार याचा उल्लेख ट्विटमध्ये केलेला नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…