ताज्याघडामोडी

SBI कडून पैसे काढण्याच्या नियमांत बदल, आता ‘एवढेच’ पैसे काढता येणार

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) एक मोठे पाऊल उचलले. बँकेने एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली. नवीन नियमांनुसार आपण आपल्या शेजारच्या शाखेत (होम ब्रांच वगळता) जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरून दिवसाला 25000 रुपये काढू शकता. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एक फॉर्म दिला जातो, ज्याला पैसे काढण्याचा फॉर्म म्हणतात. हा फॉर्म केवळ बँकेच्या शाखेत उपलब्ध आहे.

SBI मधून रोख रक्कम काढण्यासाठी नवीन नियम

(1) बँकेने जाहीर केलेल्या माहितीत असे सांगितले गेले आहे की, पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे दुसर्‍या शाखेत जाऊन ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून 25 हजार रुपये काढू शकतात.

(2) आता धनादेशाद्वारे दुसर्‍या शाखेतून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येतात.

(3) थर्ड पार्टी (ज्याला धनादेश देण्यात आला), रोख पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली.

नवीन नियमांमधील बदल कधी आणि किती काळ लागू राहतील

एसबीआयने तातडीने प्रभावीपणे नवीन नियम लागू केलेत. हे नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहतील.

नवीन नियमांसाठी अटी लागू

रोकड काढून घेण्याच्या नव्या नियमांबरोबरच बँकेनेही अटी लागू केल्यात. बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आलेय. थर्ड पार्टी विड्रॉल फॉर्मद्वारे रोख रक्कम काढू शकत नाही. याशिवाय थर्ड पार्टी केवायसी कागदपत्रही आवश्यक आहे.

एसबीआयने नियमात सहजता का आणली?

बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी बँकेने शाखांमध्ये अनेक बदल केलेत. आता फक्त बँक फक्त सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हे उघडते. तसेच बँक आपल्या कर्मचार्‍यांच्या 50 टक्के सदस्यांसमवेत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. म्हणूनच एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुविधा वाढविण्यासाठी रोख पैसे काढण्याचे नियम बदललेत, जेणेकरून कमी वेळात अधिक काम करता येईल.

एटीएममधून पैसे काढण्याचे नवीन नियम

एसबीआय आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. यात 5 एसबीआय एटीएम आणि अन्य 3 बँक एटीएमच्या व्यवहारांचा समावेश आहे. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 10 विनामूल्य एटीएम व्यवहार उपलब्ध आहेत, ज्यात एसबीआयमार्फत 5 व्यवहार करता येतात, तर अन्य 5 इतर बँकांच्या एटीएममधून करण्याची परवानगी आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago