नवी दिल्ली | कोरोना महामारीत देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचा वेगही मंदावल्याची स्थिती आहे. तर उत्तरेकडील काही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावरून आता मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मानले जाणारे मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे.
जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्यानं समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी आणखी 10 कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या, असा सल्ला नितीन गडकरी यांनी केंद्राला दिला आहे. लस उत्पादक कंपन्यांना देशात पुरवठा करु द्या आणि जर नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात, हे सर्व 15 ते 20 दिवसात केलं जाऊ शकतं, असं देखील नितीन गडकरी म्हणाले.
मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं, असं नितीन गडकरी म्हणाले होते.
दरम्यान, चंदनऐवजी इथेनॉल, डिझेल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणं स्वस्त होईल, असा सल्ला नितिन गडकरी यांनी दिला आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीवर तरंगणाऱ्या शवांबद्दल गडकरींनी प्रधानमंत्री कार्यालयात एक प्रस्ताव देखील मांडला होता.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…