ताज्याघडामोडी

योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

मुंबई: करोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ही संधी साधत राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला हाणला आहे.

महामारीला सुरुवात झाल्यापासून फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते या-ना-त्या कारणावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. एकीकडं भाजप लॉकडाऊनला विरोध करतोय, तर दुसरीकडं राज्यातील करोनाग्रस्तांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येत नाही, चाचण्यांमध्ये तडजोड करत करोना संसर्गाचा दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळं करोनाविरोधी लढ्यात अडथळे येत आहेत, याकडं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. काही महिन्यांची तुलनात्मक आकडेवारीही फडणवीसांनी पत्राद्वारे दिली आहे. बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करणं बंद करा, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

या पत्रावरून जयंत पाटील यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून करोनाच्या बाबतीत राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून फडणवीसांना त्याची आठवण करून दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी नुकतंच कौतुक केलंय. याची आपल्याला जाणीव असेल अशी आशा आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण? माननीय पंतप्रधान की तुम्ही?,’ असा खोचक सवाल पाटील यांनी फडणवीसांना केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

9 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago