थकीत वीज बिलांच्या जोडण्या तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उठवली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विरोधकांनी मागणी केल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. अधिवेशन संपताच ती उठवण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीस हुलकावणी देण्यात आली आहे.
‘महावितरणची आर्थिक स्थिती ढासळण्यास मागील सरकार कारणीभूत असून कर्ज दुप्पट आणि थकबाकी तिप्पट झाली आहे’, असा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केला. मार्च २०२० मध्ये महावितरणची एकूण थकबाकी रु. ५९,८३३ कोटींवरून डिसेंबर २०२० अखेर ती रु. ७१,५०६ कोटी असून जानेवारी २०२१ अखेर कर्ज ४६,६५९ कोटी एवढे असल्याचे ते म्हणाले.
अधिवेशनाच्या सुरुवातीला राणा भीमदेवी थाटात वीज तोडणीला स्थगिती देण्याची घोषणा करून शेवटच्या दिवशी स्थगिती उठवली ही राज्य सरकारची सर्वात मोठी लबाडी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. सभागृहात दिलेले आश्वासन पाळले नसल्याने हक्कभंग प्रस्ताव अाणू, असे ते म्हणाले.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…