महाराष्ट्र पोलीस हा राज्यातील कायदा व न्यायप्रेमी लोकांसाठी सदैव अभिमानाची बाब ठरली आहे पण काही हप्तेबाज,नशेबाज,वसुली बहाद्दर आणि दोन नंबर व्यवसायिकाचे पाठराखण करून महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारेही काही महाभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे आणि अशा महाभागांच्या मुसक्या आवळ ण्याचे काम देखील कर्तव्यदक्ष पोलीस करीत असल्याचे दिसून आले आहे.
उस्मानाबाद येथील एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या महिलेच्या आत्महत्येस एक पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने दाखल केली आहे.सदर महिलेने हरिभाऊ कोळेकर या पोलिसाने माझ्या घरी येऊन बलात्कार केला आणि तो नेहमी मला धमकावत होता व वारंवार बलात्कार करत होता अशी व्यथा मांडली आहे.या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून दोनच दिवसापूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा गुन्हा घडला होता.त्यामुळे पोलीस खात्यातील अशा नीतिमत्ताशून्य व पदाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…