ताज्याघडामोडी

न्या.गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला ओबीसी च्या सवलती द्या

मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या ३४० कलमानुसार ‘ओबीसी’साठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. भानुसे म्हणाले, ‘मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही १९९१पासून मागणी आहे. हेच आरक्षण टिकेल आणि ते राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची १८ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक पार पडली. त्यामध्ये हाच निर्णय घेतला. मराठा सेवा संघ व त्याचे ३३ कक्ष गेली तीस वर्षे मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्रात काम करत आहेत. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. अनेक न्यायिक मागण्या पुढे आल्या. त्यामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. सरकाने पहिला टप्पा म्हणून काही सवलती दिल्या. न्यायमूर्ती गायकवाड आयोगामार्फत सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्याच आधारे घटनेच्या १५(४) व १६(४) या कलमांतर्गत १३ टक्के नोकऱ्यांमध्ये आणि १२ टक्के शिक्षणामध्ये असा महाराष्ट्रापुरता ‘एसईबीसी’ हा वर्ग तयार करून मराठा समाजाला सवलती दिल्या. काही दिवस या सवलती सुरू राहिल्या. सर्वोच्च न्यायालयात त्यास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे येथून पुढे ‘ओबीसी’ समावेशासाठी लढा उभारू. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन दिले, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फतही निवेदन देऊ,’ असेही ते म्हणाले.

ओबीसीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे वर्ग आहेत. (एनटी ए, बी, सी, डी) तशीच एक सब कॅटेगरी तयार करून मराठा समाजास आरक्षण द्यावे आणि त्यानंतर ओबीसीची टक्केवारी वाढवण्यासाठी नचिपन समितीचा अहवाल स्वीकारावा. कुणबी नोंदी मराठा समाजात सापडतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने या प्रकारचे दाखले न देण्याच्या अलिखित घोषणा व सूचना दिल्या आहेत. हे दाखले देण्यासाठी शासनावर दबाव वाढवणार आहोत,’ असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राम भगुरे महानगराध्यक्ष वैशाली खोपडे, रेखा वाहटुळे, रवींद्र वाहटुळे, राजेंद्र पाटील, ॲड. अविनाश औटे उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

5 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

6 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

2 weeks ago