पती-पत्नीत भांडणं होणं हे काही नवीन नाही. काही वेळा वाद विकोपालाही जातात; मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीतल्या वादांनी टोक गाठल्यावर एकमेकांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहिलं जात नसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आग्र्यात घडली आहे. त्यात एका महिलेने आपल्या पतीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आरोप आहे.
आग्र्यात एका महिलेने आपल्या पतीची कथितरीत्या विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर तिने दोन दिवसांपर्यंत त्याचा मृतदेह घरातच ठेवल्याचा आरोप असून, त्यानंतर दुर्गंध येऊ लागल्यावर तिने पोलिसांना हत्येची माहिती दिली.
आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुशवाह याला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन तो दररोज पत्नी प्रीतीला त्रास देत असे. त्याला कंटाळून अखेर प्रीतीने नीरजच्या पायाला विजेची तार बांधली आणि त्याला शॉक दिला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, की विजेचा शॉक लागल्याने नीरजचा मृत्यू झाला आहे. आरोपी महिलेने कथितरीत्या दोन दिवसांपर्यंत मृतदेह खोलीतच ठेवला होता. सोमवारी (18 डिसेंबर) मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागल्यानंतर प्रीतीने खोलीला कुलूप लावलं आणि चावी घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. तिथे जाऊन तिने सांगितलं, की तिने तिच्या पतीची हत्या केली आहे.
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…