आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
६२ वर्षीय नरेश हे एक किलोमीटर लांब असलेल्या नातेवाईकांना दूध द्यायला निघाले होते. नरेम यांच्या पत्नीने सांगितलं की, काही अज्ञात व्यक्ती टोमॅटो खरेदी करण्यासाठी आल्याचे शेतकरी नरेम यांची हत्या केली.दरम्यान, शेतकरी नरेम यांनी काही दिवसांपूर्वीच शेतातील टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमाविले होते. हत्येचं कारण देखील याच्याशी संबंधित असू शकतं, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी केशप्पा यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चार पथक गठीत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तीन ते चार जणांनी शेतकरी नरेम यांची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकरी नरेम यांच्या कुटुबीयांशी देखील वार्ता केली आहे. शेतकरी नरेम यांचे पत्नी आणि दोन मुली असं कुटुंबं होतं.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…