अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरवला आहे. एवढचं नव्हे तर वीज कोसळून जीवितहानी होत आहे. राज्यात अनेकांचा मृत्यू झाला असून जनावरेही दगावली आहेत. आता या अवकाळी पावसाने चिमुकल्याचाही बळी घेतला आहे.
साक्री तालुक्यातील उमरपाटा येथे सलग दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस कोसळतोय. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परवा संध्याकाळी सुमारास ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. तर अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे तसेच शेतातील कांदा, भाजीपाला, कलिंगड आणि खरबूज मळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
उमरपाटा शिपरतील गावठाण पाड्यातील विशाल मगन देसाई यांच्या घराच्या पत्र्यांसह अँगलही जोरदार वादळी वाऱ्यामुळे ७० ते ८० फूट लांब उडून गेले. त्याच पत्र्याच्या अँगलला लहान मुलांसाठी झोळी बांधली होती. त्या झोळीसह अँगलही उडून गेल्याने तीन महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाले. त्याला तात्काळ धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. पण ह्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…