भारतीय हवामान विभागाने पुढचे दिवस देशातल्या बहुतेक भागांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतातल्या अनेक भागांमध्ये तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने सांगितलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस मध्य प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटासह पावसाचा आणि जलद वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने 1 एप्रिललाच उत्तर पश्चिम भारताचा काही भाग सोडून बहुतेक भागात एप्रिल ते जून महिन्यात कमाल तापमान जास्त राहील, असं सांगितलं होतं. मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात जास्त उष्णता असेल, असं हवामान खात्याने सांगितलं होतं. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजारत, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असं भारतीय हवामान खात्याचे महानिदेश मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितलं होतं.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…