ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार आमच्याकडे येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मोठी सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला.

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्यात येणार हे नक्की’, असं उदय सामंत म्हणाले. ‘कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे’, असंही उदय सामंत म्हणाले.

ही प्रत्युत्तर देण्यासाठीची सभा नाहीए. ५ तारखेच्या सभेत असं सांगण्यात आलं की मी रिकाम्या हाताने आलेलो आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, असं काही लोक सांगयला आली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी भरभरून देणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जे जे काही कोकणाला द्यायचं आहे ते घेऊन आलोय. आणि त्याची उधळण मुख्यमंत्री शिंदे हे या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत म्हणून तुम्ही आमच्याकडे राहा, अशा प्रकारचं सहानुभूतीपूर्वक भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नाहीत, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

५ तारखेला जी सभा झाली त्याला आपण सभा म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये विचार नव्हता. त्याच्यामध्ये फक्त शिव्या होत्या. कोण कोणाला लांडगा, कोण कोणाला कोल्हा म्हणत होतं. एवढचं नव्हे जे माजी खासदार आहेत अनंत गीते यांनी फार मोठी टीका केली. पण बंडाची सुरुवात माणगावमध्ये अनंत गीतेंनीच सुरू केली होती. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, असं गीते म्हणाले होते. आणि इकडे काही लोकं सांगतात की भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. मग हे विचार बदलणारं वॉशिंग मशिन काही लोकांकडे आहे. ज्यांनी बंडाशी सुरुवात केली ते एकनाथ शिंदे यांना शिकवायला चालले आहेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकत नाही. यासभेतून कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. आणि तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

3 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago