राज्य शासनाच्या महावितरण कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची महसूल विभागनिहाय जाहीर सुनावणी होईल. त्यानंतर मार्चमध्ये नवीन दर लागू होतील. ही दरवाढ दरमहा ७५ पैसे ते १.३० रुपये प्रतियुनिट असू शकते, असा दावा वीज संघटनांनी केला.
बहुवर्षीय दरनिश्चिती विनियमानुसार तिसऱ्या वर्षी नोव्हेंबरअखेर आयोगासमोर फेरआढावा याचिका दाखल करून कंपनीला फरकाची मागणी करता येते. याची पुनरावृत्ती मार्च २०२३ च्या निकालात होईल. महावितरणची गळती १४% सांगते, पण प्रत्यक्षात ३० टक्क्यांहून अधिक आहे. ही अतिरिक्त गळती म्हणजे आयोगानेच केलेल्या व्याख्येनुसार चोरी व भ्रष्टाचार आहे. ती शेतीपंपांचा वीजवापर १५% ऐवजी ३०% दाखवून लपवली जात आहे, असा आरोप वीज संघटनांनी केला.
दरवर्षी १३ हजार कोटी रुपयांची वीजचोरी, भ्रष्टाचार दरवर्षी १५ टक्के वीज गळती याचा अर्थ आजच्या दरानुसार दरवर्षी १३,००० कोटी रुपये हे चोरी आणि भ्रष्टाचारामध्ये जात आहेत. या सर्व रकमेचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांवर पडत आहे, असा दावा वीज ग्राहक संघटनेने केला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…