एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.”
ते पुढे म्हणाले, “हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आता पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासात त्यांचं व्हिजन आम्ही समजून घेणार आहोत.”
“दिल्ली दौऱ्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुषार मेहता यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाविना महापालिका किंवा इतर निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे,” असं त्यांनी म्हटलं.
“महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रश्नच नाही. काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असं शिंदे म्हणाले.
“बंड केलेले आमदार पैशांच्या मागे गेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराने ते आमच्यासोबत आले आहेत. आम्हाला 164 आमदारांचं समर्थन आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्न नाही,” असंही त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…