मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या अपघातामध्ये तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
खटखरी पोलीस स्थानकाचे सब-इन्स्फेक्टर प्रज्ञा पटेल यांनी सांगितले की, तिघे भाऊ दहावीची अंतिम परीक्षा देऊ घरी परतत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकच्या टायरखाली आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ताज अंसारी, रानू अंसारी आणि इश्मा अंसारी अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.
महाराष्ट्रात ट्रकने दोघांना चिरडले
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात महामार्गावर एका वेगवान ट्रकने दोन लहान मुलांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मोखाडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोही सोनार आणि पायल वारखडे अशी मृतांची नावे आहेत.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…