मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या अपघातामध्ये तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
खटखरी पोलीस स्थानकाचे सब-इन्स्फेक्टर प्रज्ञा पटेल यांनी सांगितले की, तिघे भाऊ दहावीची अंतिम परीक्षा देऊ घरी परतत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकच्या टायरखाली आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ताज अंसारी, रानू अंसारी आणि इश्मा अंसारी अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.
महाराष्ट्रात ट्रकने दोघांना चिरडले
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात महामार्गावर एका वेगवान ट्रकने दोन लहान मुलांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मोखाडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोही सोनार आणि पायल वारखडे अशी मृतांची नावे आहेत.
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…