ताज्याघडामोडी

एसटी संप सुरूच राहणार; विलीनीकरणाबाबत कामगार ठाम

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने विलीनीकरणाबाबत अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत तोंडी मागितल्याची माहिती समोर येत आहे.

यामुळे आणखी काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सरकारने अहवाल देण्यासाठी न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीला अहवाल तयार करून त्यावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय घेऊन तो न्यायालयात दाखल करावा, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या. यासाठी १२ आठवड्यांची मुदत समितीला दिली होती. ती ३ फेब्रुवारीला संपली.

अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही. यामुळे अहवाल तयार करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत सरकारकडून मागण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता, याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याबाबत सरकारशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले.

तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने आर्थिक तंगीला कंटाळून एकूण ८० जणांना आत्महत्या केली आहे. यांमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असा दावा एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सध्या ६५ हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. गेल्या तीन महिन्यांत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबानाची कारवाई करण्यात आली असून, आठ हजार ६२९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

प्रवाशांची जबाबदारी कोण घेणार?

करोनापूर्व काळात एसटीच्या जवळपास एक लाख फेऱ्यांमधून ६० लाखांहून अधिक प्रवाशांची रोज वाहतूक होत होती. करोनासंसर्ग ओसरल्यानंतर गाड्या सुरू झाल्या, मात्र संपामुळे वाहतूक ठप्प झाली. सध्या आठ हजार गाड्या सुरू केल्याचा महामंडळाचा दावा आहे.

न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीची मुदत संपून शनिवारी तिसरा दिवस उजाडला आहे. ‘समिती सरकारची आहे, त्यामुळे त्यांना विचारणे योग्य ठरेल’, अशी भूमिका महामंडळाने घेतली. मुदतवाढीबाबत समिती सदस्य आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी कॉल आणि संदेशाद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे प्रवाशांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

2 minutes ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago