पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यात ऊस,द्राक्ष,केळी,डाळींब आदी पिकांना वेळेत पाणी देणे गरजेचे असते मात्र महावितरण कडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा समाना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणच्या या मोहिमेमुळे उध्वस्त होणार आहे.त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे.जर तात्काळ हि मोहीम थांबविली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…