एसटी कामगारांनो पटणार नाही पण लिहतोय !

१९८२ चा गिरणी कामगारांचा संप चुकीचा नव्हता आणि मागण्याही रास्त होत्या.मुंबईच काय साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला गिरणी कामगारांच्या वेदना पहावत नव्हत्या.पण पुढे राजकारण शिरले आणि धनाड्य गिरणी मालक तर वाटच पहात होते या संधीची.
एसटी कामगारांवर अन्याय होतोय हे त्रिवार सत्य आहे पण कोरोनाच्या आर्थिक संकटातून आता कुठे आपण बाहेर पडलो आहोत.आपण १४ दिवस केलेला संप पहिला टप्पा म्हणून तरी यशस्वी झालाय कारण सामान्य जनतेचे हाल होत असले तरी जनतेला तुमच्या बाबत प्रचंड सहानुभूती आहे.सरकार मध्ये विलीनीकरण हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवा,बाकी मागण्या पदरात पाडून घ्या आणि विलीनीकरणासाठी सरकारला ६ महिन्याची मुदत द्या आणि थांबा असेच मला म्हणावेसे वाटते.कामगार नेते स्वर्गीय दत्ता सामंत हे सच्चे होते,त्यांनी पुकारलेला संपही पराकोटीचा अन्याय सहन केल्यानंतरची प्रतिक्रिया होती पण झाले उलटेच.धनाढय गिरणी मालकांनी त्या संपाचाही संधी म्हणून पद्धतशीर उपयोग करून घेतला. पुढे गिरणी कामगारांचा संप मिटला पण गिरण्याच बंद पडल्या होत्या. एसटी कामगारांच्या संपाबाबत आज या राज्यातील प्रत्येक सामान्य नागिरकाला सहानुभूती आहे पण सामान्य जनता विसराळू आणि राज्यकर्ते महाभयानक स्मरणशक्ती असलेले असतात.
अशातच बीओटी आणि आऊट सोअर्सिंग च्या नावाखाली सारे कामगार कायदे गुंडाळून ठेवत सरकार,निमशासकीय संस्था आणि उद्योजक कमी खर्चात ”नफ्याचा रिझल्ट” पदरात पाडून घेण्यात माहीर होऊ लागले आहेत.
आणि या महाविकास आघाडी सरकारमधील एकही मंत्री,नेता,आमदार,जिल्हा पातळीवरील,तालुका पातळीवरील पदाधीकारी तुमची बाजू योग्य असताना देखील बोलायला तयार नाहीत कारण त्यांची बांधिलकी त्यांच्या नेत्यांशी,पक्षाशी आहे.
त्यामुळेच मला वाटते एसटीला थोडे सावरुद्या,विलिनीकिरणासाठी सरकारला मुदत द्या आणि संप मागे घ्या.
कारण या संपाबाबत मी निरीक्षण केलंय,या सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हाती आहे त्यांना तुमच्या विलीनीकरणाच्या विषयाबाबत जरासुद्धा सहानुभूती नाही.
पण याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या एका निर्णयाची आठवण मी जरूर करून देतो,एसटी महामंडळाला राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला कि बिग ब्रेकींग बातमी होते.कारण या १०० कोटी रुपयात या एसटी कामगारांना १ महिन्याचा थकलेला पगार मिळणार असतो.
माननीय मुख्यमंत्र्यांनी सत्त्तेवर येताच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचा आठवडा जाहीर केला.पूर्वी शनिवारी दुपारी जेवायला गेलेले बहुतांश शासकीय कर्मचारी सोमवारीच ऑफिसकडे फिरकत असत.आता शुक्रवारी दुपार नंतर बहुतांश शासकीय कार्यालयात तीच अवस्था असते .आणि मला मिळालेल्या माहितीनुसार या शासकीय कर्मचाऱ्याचा एक दिवसाच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये शासन खर्च करते.मुख्यमंत्र्यांच्या कुणाचीही मागणी नसताना दोन शनिवार घरी बसून पगार देण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचा अंदाजे ६०० कोटींचा फटका महिण्याकाठी शासन सहन करीत असते.सामान्य जनता शासकीय कार्यालयात हेलपाट्याने बेजार होणार असताना.बघा जमलेच तर याही निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी सखोल अभ्यास करावा.
शेवटी हे माझे व्यक्तिगत मत आहे,आपण संघटितपणे आणि साकल्याने विचार करून निर्णय घ्याल हि अपेक्षा.
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता )
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago