ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवणं चुकीचं आहे. हा सामना थांबवला पाहिजे. खेळाडूंनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखलं पाहिजे. यासंदर्भात मी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार आहे.
रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…