पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे उजनी धरणात दौण्डहून येणाऱ्या निसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तविला असून त्यामुळे उजनी धरण व्यस्थापन सतर्क झाले आहे.आज रात्री ९ वाजता उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पंढपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या बाबत प्रांताधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार आज रात्री ८ वाजता उजनी धरणाचा उपयुक्त साठा १०८% इतका झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे.यामुळे दौण्डहून निसर्गात वाढ होण्याची शक्यता असून पुरनियंत्रणाच्या दृष्टीने धरण व्यवस्थपणाने आज रात्री ९ वाजले पासून ५ हजार क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडण्याचे निश्चित केले.या विसर्गात परिस्थिती पाहून कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…