केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे.मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.
ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असे सरनाईक म्हणाले. आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे उघडावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. अनेकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. परंतु, अशा संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आयतच निमंत्रण मिळेल.
त्यामुळे देव्हाऱ्यात देवाची पूजा करावी. मंदिरे उघडण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी, असे सांगतानाच आज ना उद्या शाळाही उघडतील. याबाबत सरकार आणि लवकर तोडगा काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…