करोना बाधितांची संख्या घटत आहेत. बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत; मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दल निर्णय झालेला नाही. वारकऱ्यांनी सरकारकडे यंदा किमान पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असे म्हणत वारकरी संप्रदायाने सरकारला तीन पर्याय दिले आहेत. सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल; मात्र सरकारने पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी अभय टिळक यांनी केली आहे.
‘देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर या देवसंस्थानांच्या वारी सोहळ्यासाठी सरकारने प्रत्येकी 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. करोना स्थिती वाढली, तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढेच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत,’ अशी माहिती अभय टिळक यांनी दिली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…