ताज्याघडामोडी

यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय

सोलापूर : राज्यातील नगर, सोलापूर (Solapur), सातारा, कोल्हापूर, गोंदिया या जिल्ह्यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून, अजूनही 14 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असून, त्यात सर्वाधिक धोका बालकांनाच असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाइन शाळा सुरू होणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, असेही सांगण्यात आले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 11 हजार तर राज्यातील जवळपास एक लाखाहून अधिक बालकांना (0 ते 18 वयोगट) कोरोनाची बाधा झाली असून, काहींचा मृत्यूही झाला आहे. सध्या मुंबई, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत संसर्ग कमी होईपर्यंत ऑनलाइन शिक्षणावरच भर राहील, असे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, सद्य:स्थितीत ऑफलाइन शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही, असा अभिप्राय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन संबंधित जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ऑफलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर संसर्ग पूर्णपणे कमी झाल्यावर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होतील, असा अंदाज शिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्‍त केला. तूर्तास स्वाध्याय पद्धतीनेच त्यांचा सराव घेतला जाईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन शिक्षणाची फी द्यावीच लागेल

कोरोनामुळे यंदाही शाळा ऑफलाइन सुरू होणार नाहीत. 14 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर पालकांना संबंधित खासगी शाळेला शैक्षणिक फी द्यावीच लागेल. परंतु, संपूर्ण वर्षाची फी भरताना पालक व शाळांनी आपापसात त्याचे टप्पे पाडावेत. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, तरीही ते फुकटात येत नाही. त्यांनाही शिक्षकांचे मानधन द्यावे लागते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही पालकांना खासगी शाळांची फी भरावीच लागेल, असे शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी “सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

वर्गनिहाय मुलांची संख्या

पहिली ते आठवी : 1,46,86,493

नववी ते बारावी : 56,48,028

एकूण विद्यार्थी : 2,03,34,521

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago